18/04/2026
Sh*ta Agro
*शाश्वत कृषी आंबा आणि धान्य महोत्सवा'चा बीडमध्ये प्रारंभ!
नाबार्ड अन् कृषी विभागाचा पुढाकार
बीड:- शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकाराने प्रथमच आयोजित केलेल्या शाश्वत कृषी आणि आंबा महोत्सवास शुक्रवारी 17 सुरुवात करण्यात आली.
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ संभाजीनगर आणि शिता शेतकरी उत्पादक कंपनी पौंडुळ, शिरूर यांच्या मार्फत आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनामुळे जिल्ह्याच्या कृषी वैभवाचे दर्शन घडवणारा आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या कष्टाला हक्काची बाजारपेठ मिळवून देणारा पहिला उत्सव ठरत आहे. केवळ विक्रीच नव्हे, तर शाश्वत शेतीचा विचार रुजवणारा हा महोत्सव बीडकरांच्या पसंतीस उतरला असून, पहिल्याच दिवशी नागरिकांनी या महोत्सवात मोठी गर्दी केली.
या सोहळ्याचे उद्घाटन नाबार्डचे "जिल्हा विकास व्यवस्थापक श्री.तात्यासाहेब मारकड* यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणाले "आजच्या बदलत्या हवामानात पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेती करणे ही केवळ गरज नसून अनिवार्य झाले आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील अंतर कमी करूनशेती माल उत्पादकाला थेट नफा मिळवून देण्यासाठी नाबार्ड सदैव कटिबद्ध आहे."
जिल्हा कृषी अधीक्षक जिल्हा अधिकारी श्री. सुभाष साळवे म्हणाले की शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांच्या समन्वयातून प्रगती करावी तसेच शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनाचे ब्रँडिंग करावे
तसेच याप्रसंगी गोसेवा गतिविधि प्रांत प्रशिक्षण प्रमुख श्री.रवींद्र देशमुख यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत शिता FPC चे श्री. सुनील बापू खेडकर यांनी केले.
महोत्सवाचे मुख्य आकर्षण
या महोत्सवात नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे, विविध प्रकारची तृणधान्ये, ताजी फळे, आणि प्रक्रिया केलेले गृहनिर्मित अन्नपदार्थ यांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. मध्यस्थांची साखळी मोडीत काढून शेतकऱ्यांनी आपला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक बोरकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सावित्रीबाई फुले संस्थेचे शाश्वत विकास विभाग प्रमुख श्री.कैलास राठोड यांनी मानले.