श्री स्वामी कृपा आंबेवाले

  • Home
  • India
  • Pune
  • श्री स्वामी कृपा आंबेवाले

श्री स्वामी कृपा आंबेवाले कोकणचा राजा अस्सल रत्नागिरी हापुस आंबा
🥭नैसर्गिकरित्या पिकवलेला रसाळ व गोड आंबा

26/04/2025

||श्री स्वामी समर्थ||
🥭🥭 कोणत्याही केमिकल प्रक्रिये शिवाय पिकवलेले आंबे आम्ही उपलब्ध करत आहोत. आता पुण्यात ...
थेट रत्नागिरीच्या बागेतून आपल्या घरी. खास फक्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपक्रम
शेतकऱ्यांच्या कडून थेट तुमच्या घरात.

5 dozen साईज २५० - ३०० ग्रॅम
6 dozen साईज २०० - २५० ग्रॅम
7 dozen साईज १५०-२०० ग्रॅम

कुठलीही पेटी ₹3500.

घरपोच सेवा उपलब्ध
आजच आपली पेटी बुक करून ठेवा
आजच कॉल करा.☎ 9209651115

टीप - आंबा हा कच्चा असतो तो लाकडी पेटीतूनच पोहोचवण्यात येईल... आंबा सुरक्षित राहील आणि तुमच्या घरात तो 5 ते 6 दिवसात पिकतो🥭🥭

22/04/2025

श्री स्वामी समर्थ
रत्नागिरी हापूस आंबा

केमिकल विरहित फळाच्या चवीचा आस्वाद घ्या 😋😋😋 चवीला अतिशय उत्तम,केशरी फ़ळ , चवीला सुमधुर
१) शेतकरी ते ग्राहक
२) नैसर्गिकरित्या पिकवले
३) उत्तम क्वालिटी आणि परवडेल अशी किंमत
४) फ्री होम डिलिव्हरी, कॅश / ऑनलाईन पेमेन्ट.

दर्जेदार, केमिकल विरहित हापूस आंबे ऑर्डर करण्या साठी आम्हाला खालील नंबर वर संपर्क साधा.
092096 51115

हापूस आंब्यांचे पीक कमी ;दरात वाढ होण्याची शक्यतानवी मुंबई :-   यंदा हापसू आंब्यांची आवक घटणार असल्याची शक्यता वर्तवण्या...
10/03/2025

हापूस आंब्यांचे पीक कमी ;
दरात वाढ होण्याची शक्यता

नवी मुंबई :- यंदा हापसू आंब्यांची आवक घटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खवय्यांना मनसोक्त हापूस खाता येणार नसल्याची चिन्हे आहेत. एपीएमसी बाजारात यावर्षी हापूस हंगाम सुरळीत राहील अशी अपेक्षा होती; परंतु ऐन फळधारणेच्या कालावधीत हापूसच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
पाऊस, हवामान बदल, तसेच कडाक्याच्या थंडीने हापूस आंब्यांवर परिणाम झाला असून उत्पादन घटले आहे. यंदा ३५ ते ४० टक्के उत्पादन असेल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. मागील वर्षी बाजारात फेब्रुवारी महिन्यात लवकर आवक सुरू झाली होती, तर मार्चमध्ये हंगाम सुरू झाला होता, मार्चमध्ये ४० ते ५० हजार पेट्या दाखल होत होत्या. यावेळी मात्र मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या आंब्यात घट होऊन कमी हापूस दाखल होत आहे. फेब्रुवारीमध्ये एक दिवस आड कोकणातील हापूसच्या पेट्या दखल होत होत्या, तर सध्या बाजारात आता तीन ते साडेतीन हजार पेट्या दाखल होत आहेत. त्यामुळे यावर्षी हापूसचा हंगाम अवघा ३५ ते ४० टक्के आहे. तसेच मे अखेरपर्यंत सुरू असणारा हंगाम लवकर संपुष्टात येणार आहे.
तीन ते चार महिने हापूसचा हंगाम सुरू असतो. यंदा मात्र २० मार्च ते एप्रिल अखेर तसेच काही तुरळक आवक १० मेपर्यंत राहणार असल्याची माहिती एपीएमसीतील फळ मार्केटमधील घाऊक फळ व्यापारी यांनी व्यक्त केले आहे. सध्या बाजारात रत्नागिरी, देवगडचा, रायगडचा हापूस दाखल होत असून चार ते सहा डझनाच्या पेटीची तीन हजार ते सहा हजार रुपये दराने विक्री होत आहे. कोकणातून आंब्याच्या पेट्या वाशी मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत. आंब्यांचे पीक कमी होत असल्याने आंब्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Address

Sinhagad Road
Pune
411041

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री स्वामी कृपा आंबेवाले posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category