यशवंतराव चव्हाण महाविद्यालय वार्ता

  • Home
  • India
  • Sillod
  • यशवंतराव चव्हाण महाविद्यालय वार्ता

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय वार्ता College Daily Activity News

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात योगा दिवस उत्साहात  साजरा सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात एनसीसी व राष्ट्रीय स...
23/06/2026

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात योगा दिवस उत्साहात साजरा
सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात एनसीसी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित राहून अनेक योगासने यावेळी सादर केली . निरोगी व दीर्घ आयुष्य जगायचे असेल तर त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये योगाभ्यास रुजविणे गरजेचे आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली व एन.सी.सी. चे कॅप्टन डॉ. डी एस गवळीकर यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर केली..

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अग्निवीर आर्मीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान सोहळा संपन्न.सिल्लोड, दि. 08...
23/06/2026

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अग्निवीर आर्मीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान सोहळा संपन्न.

सिल्लोड, दि. 08 जून 2026 :
यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड येथे एनसीसी विभाग व राजर्षी शाहू अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने अग्निवीर आर्मीमध्ये निवड झालेल्या तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना त्यांच्यापासून इतर युवकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. राहुल पालोदकर हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पंडित, उपप्राचार्य डॉ. गंगाधर मोरे तसेच एनसीसी कॅप्टन डॉ. ज्ञानेश्वर गवळीकर यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अग्निवीर आर्मीमध्ये निवड झालेल्या सागर भोसले, गणेश सुरे, वैभव चरवंडे, मयूर हिवाळे, तेजस जंजाळ, यश पंडित, अभिषेक फोलाने, वैभव भोसले, बबलू सोनवणे, दीपक काळे, दत्ता बर्डे, गणेश वराडे, आकाश काळे, अजय काकडे, नागेश समिंद्रे, पवन पालोदकर, वैभव सपकाळ, तुषार बावस्कर, राधेश्याम तंबडे, आदित्य मादणीकर, दीपक मिसाळ आदी विद्यार्थ्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात एनसीसी विभागाचे लेफ्टनंट डॉ. ज्ञानेश्वर गवळीकर यांनी कामठी (नागपूर) येथे यशस्वीरीत्या रिफ्रेशर कोर्स पूर्ण करून कॅप्टन पदाची प्राप्ती केल्याबद्दल त्यांचाही संस्थेचे सचिव डॉ. राहुल पालोदकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
सन्मानित विद्यार्थ्यांपैकी दीपक काळे व आदित्य मादणीकर यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या यशामागील अथक परिश्रम, नियमित सराव, जिद्द आणि कुटुंबीयांच्या पाठबळाचा उल्लेख केला. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कठोर मेहनत, शिस्त आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून दिले.
प्रमुख मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. अशोक पंडित म्हणाले की, "यश मिळेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. अनेक विद्यार्थी रात्रीच्या वेळी रस्त्यावर आणि मैदानावर कठोर सराव करून अग्निवीरसारख्या स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळवतात. यश अद्वितीय असते. त्यामध्ये आई-वडिलांच्या कष्टांचे चीज आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्तता दडलेली असते. देशसेवा ही सर्वोच्च सेवा असून अग्निवीर योजना युवकांना कमी कालावधीत देशासाठी योगदान देण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देते."
अध्यक्षीय समारोपात डॉ. राहुल पालोदकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, "अग्निवीरमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव केवळ त्यांच्या गावापुरता मर्यादित राहू नये, तर तालुकास्तरावर त्यांचा सन्मान व्हावा, अशी माझी संकल्पना होती. यशस्वी विद्यार्थ्यांच्या प्रेरणेतून इतर युवकांनाही नवी दिशा मिळेल. अपयश आलेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता अधिक जोमाने प्रयत्न करावेत. गरीब कुटुंबातील अनेक मुले प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करतात. शिक्षण आणि संधी मिळाल्यास ग्रामीण भागातील युवकही देशाच्या सेवेत मोठे योगदान देऊ शकतात."
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन डॉ. ज्ञानेश्वर गवळीकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश्वर शेजुळ यांनी तर आभार ज्ञानेश्वर हिलाले यांनी केले.
या प्रेरणादायी कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘पानिपतच्या युद्धामुळे भारताचा भूगोल टिकला’सिल्लोड, ता. २८ (बातमीदार) :पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांनी मोठा संहार ...
29/01/2026

‘पानिपतच्या युद्धामुळे भारताचा भूगोल टिकला’
सिल्लोड, ता. २८ (बातमीदार) :
पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांनी मोठा संहार सोसावा लागला असला, तरी मराठ्यांच्या त्या पराक्रमाने अहमदशहा अब्दाली प्रचंड घाबरला होता. महादजी शिंदे यांनी दिल्ली काबीज केली नसती, तर आजच्या भारताचा भूगोल अफगाणिस्तानला जोडला जाऊन भारताचा नकाशा बदलला असता, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते डॉ. राजेश करपे यांनी केले.
वतीने आयोजित ‘पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचे स्मरण’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक पंडित होते. डॉ. करपे पुढे म्हणाले की, पानिपतच्या रणसंग्रामाने मराठ्यांच्या शौर्याची प्रचिती जगाला दिली. या युद्धामुळे परकीय आक्रमकांना जरब बसली, ज्यामुळे भारताचा भूगोल सुरक्षित राहण्यास मदत झाली.
कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. गंगाधर मोरे, डॉ. सुनील पांडे, डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ. अंकुश जाधव, डॉ. एकनाथ खरात, डॉ. जगदीश सावळेकर आणि डॉ. राजेश माकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. प्रविण चव्हाण, सूत्रसंचालन प्रा. चंद्रमणी भद्रे यांनी केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता विकसित केल्यास निश्चित ध्येय साध्य करता येईल.               -उपप्राचार्य डॉ.गंगाधर मोरे.(श...
23/01/2026

विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता विकसित केल्यास निश्चित ध्येय साध्य करता येईल.
-उपप्राचार्य डॉ.गंगाधर मोरे.
(शेलगाव )
'विद्यार्थ्यांनी मनातील न्यूनगंड बाजूला करून आपल्या क्षमता विकसित कराव्यात आणि एक निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी, त्यात तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड येथिल उप प्राचार्य गंगाधर मोरे यांनी केले. चिंचोली लिंबाजी येथील धारेश्वर शिक्षण संस्थेच्या, कला व विज्ञान महाविद्यालयाच्या गणेशपुर येथे राष्ट्रीय योजनाच्या शिबिरात मोरे बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. पुरुषोत्तम मनगटे हे होते. अध्यक्षीय समारोप करताना ते म्हणाले की, 'विद्यार्थ्यांनी बदलत्या परिस्थितीचा विचार करून आपल्या क्षमता विकसित कराव्यात. आपल्यातील क्षमता ओळखून त्या कार्यान्वित केल्यास जीवनातील ध्येय सहजपणे साध्य करता येते. यासाठी युवाशक्तींना आपल्या अंतर्गत गुणवैशिष्ट्यांची चांगल्या प्रकारे ओळख होणे आवश्यक आहे. असेही डॉ. मनगटे यांनी सांगितले. सूत्रसंचालन भाग्यश्री भुजंग यांनी केले तर आभार अंकिता ढवळे यांनी केले. या वेळी कार्यक्रमाधिकारी प्रा.संजय मगर, कार्यक्रमाधिकारी प्रा.वंदना पाटील, प्रा.विक्रमसिंह पवार, प्रा.उमाकांत गायकवाड, प्रा.राजेश कांबळे, प्रा.योगेश भाले, प्रा.सुनील काळे, डॉ.गजानन चिट्टेवाड, प्रा.वंदना बनकर, प्रा.प्रतिभा आघार्डे, प्रा.रामेश्वर राऊत यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

सरस्वती भुवन विद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' उत्साहात संपन्न. दिनांक 20/01/2026 ​भराडी (प्रतिनिधी): येथील सरस्वत...
22/01/2026

सरस्वती भुवन विद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' उत्साहात संपन्न.

दिनांक 20/01/2026 ​भराडी (प्रतिनिधी):

येथील सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्ताने आयोजित करण्यात आलेली विशेष मराठी व्याकरण कार्यशाळा अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास, व्याकरण आणि स्पर्धा परीक्षेतील महत्त्वाचे पैलू उलगडून सांगण्यात आले.
या कार्यशाळेसाठी प्रमुख व्याख्याते म्हणून सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे डॉ.ज्ञानेश्वर शेजुळ उपस्थित होते. प्राचार्य कोठावदे यांच्या वतीने प्रा. तानाजी मादळे यांच्या हस्ते डॉ. शेजुळ यांना पेन आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
मराठी भाषेचा गौरवशाली प्रवास
​मार्गदर्शन करताना डॉ. शेजुळ यांनी मराठी भाषेच्या प्राचीन इतिहासाचा आढावा घेतला. ते म्हणाले की," संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यामुळे मराठी भाषा खऱ्या अर्थाने समृद्ध झाली." केंद्र सरकारने मराठी भाषेला अलीकडेच दिलेल्या'अभिजात दर्जा बाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. हा दर्जा मिळवण्यासाठी भाषेचे प्राचीनत्व आणि साहित्यिक योगदान हे निकष कसे महत्त्वाचे ठरले यावर त्यांनी प्रकाश टाकला.
​दुसऱ्या सत्रात डॉ. शेजुळ यांनी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मराठी व्याकरणातील घटकांवर सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने
लिंग विचार, वचन विचार,
विभक्ती विचार, प्रयोग, समास आणि अलंकार ​या विषयांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण देत त्यांनी व्याकरणातील क्लिष्टता दूर केली. तसेच, सध्याच्या स्पर्धा परीक्षांच्या युगात मराठी विषयाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे आणि परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, यावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
​या कार्यशाळेला सरस्वती भुवन विद्यालयातील प्रा.नंदकिशोर मिरठकर,प्रा.स्वाती नाकील व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.तानाजी मादळे यांनी मानले.

20/01/2026
तालुका विधी सेवा समिती, सिल्लोड येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा.सिल्लोड | प्रतिनिधीतालुका विधी सेवा समिती...
20/01/2026

तालुका विधी सेवा समिती, सिल्लोड येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा.

सिल्लोड | प्रतिनिधी
तालुका विधी सेवा समिती, सिल्लोड यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी विशेष व्याख्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास न्यायव्यवस्था, वकिली क्षेत्र तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. सु. शा. देशमुख साहेब, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) हे होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. ज्ञानेश्वर शेजुळ, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, सिल्लोड यांनी मार्गदर्शन केले. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. के. टी. आढायके साहेब, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), श्री. एम. व्ही. किरमे साहेब, श्री. ए. एच. तट्टू साहेब, महाराष्ट्र बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. सावंत साहेब, तसेच वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अशोक तायडे साहेब उपस्थित होते.

प्रमुख वक्ते प्रा. डॉ. ज्ञानेश्वर शेजुळ यांनी आपल्या व्याख्यानात मराठी भाषा संवर्धन ही एक अविरत चालणारी प्रक्रिया असल्याचे सांगितले. सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. भाषेतील प्रचलित शब्द, त्यांना प्राप्त झालेले अर्थ, बोलीभाषा व व्याकरणाचे नियम समजून घेणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा संवर्धनासाठी चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचा उल्लेख करत, विल्यम कॅरी, एलफिन्स्टन, जॉर्ज ग्रीअरसन यांनी मराठी भाषेचा शास्त्रीय अभ्यास करून व्याकरणाचे नियम व विरामचिन्हे दिल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी जास्तीत जास्त मराठी भाषेत संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. श्री. सावंत साहेब यांनी मराठी भाषेतील उच्चार प्रक्रियेचे महत्त्व विशद केले. एखाद्या शब्दावर चुकीचा जोर दिल्यास अर्थाचा अनर्थ होऊ शकतो, त्यामुळे भाषा अत्यंत जपून आणि शुद्ध वापरली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. न्यायाधीश आढायके साहेब यांनी वकील संघांना जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करण्याचे आवाहन केले. सामान्य माणसाचे प्रश्न मराठी भाषेतून समजून घेणे न्यायप्रक्रियेस अधिक सुलभ ठरेल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना मा. दिवाणी न्यायाधीश श्री. सु. शा. देशमुख साहेब यांनी मराठी भाषा संवर्धन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. मराठी भाषा समजून घेणे, तिचा संवादासाठी प्रभावी वापर करणे यामधूनच खऱ्या अर्थाने भाषा संवर्धन साध्य होईल, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अशोक तायडे यांनी केले. त्यांनी मराठी भाषा संवर्धनाचे महत्त्व व त्यामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. राजेंद्र गोराडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. ………. यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. विटोरे साहेब यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास विधी विभागातील सर्व कर्मचारी, वकील संघाचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

माणिकराव पालोदकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या इंग्रजी भाषा प्रयोगशाळेला भेट.  सिल्...
17/01/2026

माणिकराव पालोदकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या इंग्रजी भाषा प्रयोगशाळेला भेट.
सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रयोगशाळेला एम.पी. इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी भाषा प्रयोगशाळेत वापरले जाणारे सॉफ्टवेअर, त्याची कार्यपद्धती व सॉफ्टवेअर मधील मॉड्युल्सची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी संगणक कौशल्य भिमुख कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पंडित हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी इंग्रजी विभागातील डॉ. जे डी परदेशी, डॉ. व्ही. डी. पिसे, प्रा. जी. एम. सूर्यवंशी यांनी अनुक्रमे लेटर रायटिंग, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आणि आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग या विषयावर पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील भाषा प्रयोगशाळा ही फक्त महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यां पुरती मर्यादित न राहता परिसरातील शाळेच्या विद्यार्थ्यांनाही लाभ झाला पाहिजे या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पंडित यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेचा अधिकाधिक वापर करण्याचे तसेच आजच्या स्पर्धात्मक युगात नवनवीन कौशल्य आत्मसात करून घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थी असताना मिळालेल्या ज्ञानाचा व कौशल्याचा विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात निश्चितच फायदा होतो असे सांगत त्यांनी इंग्रजी विभागाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जी एम सूर्यवंशी तर आभार प्रदर्शन डॉ. जे. डी. परदेशी यांनी केले. यावेळी डॉ.व्हि. डी. पिसे, डॉ. आर. एस. माकणीकर एम .पी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा दौड, सहाय्यक शिक्षक बाबासाहेब जाधव, सहाय्यक शिक्षिका पूनम खीरडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात एम. पी. इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला व करा कार्यक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात एकदिवसीय मार्शल आर्ट प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्नसिल्लोड | प्रतिनिधी | दि. १६ जानेव...
17/01/2026

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात एकदिवसीय मार्शल आर्ट प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न
सिल्लोड | प्रतिनिधी | दि. १६ जानेवारी २०२६
राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मनियंत्रण, आत्मविश्वास व स्वसंरक्षणाची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड (ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे प्राचार्य डॉ. अशोक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय मार्शल आर्ट मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
सदर कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या Internal Complaint Committee (ICC) च्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जी. एन. मोरे हे होते. तर सुप्रसिद्ध व अनुभवी मार्शल आर्ट प्रशिक्षक कोच अँथनी व्हास्तक यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. श्रीमती. आर. ई. कापसे यांनी केले.
कार्यक्रमास प्रा डॉ. श्रीमती. एस. व्ही. जावळे, प्रा. श्रीमती. एम. एल. ठाकूर, प्रा. श्रीमती. आय. सी. साळुंके, प्रा.डॉ. डी. आर. पानझाडे प्रा. स्नेहा सिनकर, व्ही . बी. जगताप, यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या प्रारंभी प्रशिक्षकांनी वॉर्म-अप व शारीरिक व्यायाम घेऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी सज्ज केले. त्यानंतर मार्शल आर्टचा इतिहास, त्याचे महत्त्व, दैनंदिन जीवनातील उपयोग व शारीरिक-मानसिक फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान पंच, किक, ब्लॉक, संतुलन राखणे तसेच स्वसंरक्षणाच्या मूलभूत तंत्रांचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांनी या तंत्रांचा उत्साहाने सराव केला.
दुपारच्या सत्रात महिलांच्या आत्मसंरक्षणावर विशेष भर देण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत महिलांनी कशी प्रतिक्रिया द्यावी, छेडछाड किंवा हल्ल्याच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण कसे करावे, पकडीतून सुटका करण्यासाठी कोणती प्रभावी तंत्रे वापरावीत, याचे सखोल व प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, निर्भयता व सजगतेची भावना निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. जी. एन. मोरे यांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या विचारांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध, सक्षम व आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन केले. आजच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. श्रीमती. आर. ई. कापसे यांनी प्रशिक्षण कार्यशाळेचे महत्त्व विशद केले, तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. श्रीमती. आय. सी. साळुंके यांनी तर डॉ. डी. आर. पानझाडे यांनी आभार प्रदर्शन केले.
या यशस्वी कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये मार्शल आर्ट व आत्मसंरक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

*यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन उत्सहात* . सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये 'वाचन संकल्प मह...
13/01/2026

*यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन उत्सहात* .
सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' या उपक्रमा अंतर्गत तसेच राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उदघाटन उपप्राचार्य डॉ. गंगाधर मोरे,रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.देविदास वाणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रदर्शनात राजमाता जिजाऊ संभदित राजमाता जिजाऊ, जिजाऊ द मदर ऑफ द गुरुज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सारखे पुस्तके प्रदर्शनात ठेवण्यात आली होती, त्याच बरोबर कर्मयोग, व्यक्ती व्यक्तिमत्व विकास, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग, विवेकलहरी, ग्रंथावलीचे खंड, अग्निमंत्र, आत्मनुभूती,तरुणांना कानमंत्र यासारखे अनमोल ग्रंथ प्रदर्शनात वाचकांना वाचनास मिळाली.प्रदर्शनास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Address

Yeshwantrao Chavan College, Bypass Road
Sillod

Alerts

Be the first to know and let us send you an email when यशवंतराव चव्हाण महाविद्यालय वार्ता posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category